
वाळूजमहानगर, (ता.6) : – जामगाव येथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत जल जीवन मिशन योजनेचे रू 66.00 लक्ष कामाचे भूमीपूजन कुंडलिक अण्णा माने यांच्या व युवा नेते संतोषभाऊ माने यांच्या हस्ते उत्साहात झाले.

या योजनेमुळे गावातील प्रत्येक घरामध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विशेषतः महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या वेळी उपस्थित सरपंच बशीर पटेल, उपसरपंच गणेश पंडीत, माजी सभापती विनोद काळे, सुनील बोराटे, किशोर जोशी, नितीन तांबे, भगवान ठवाळ, भगवान ठवाल, संतोष माने, भारत तुपलोंढे, सोमनाथ तागड, अंकुश मोरे, बर्वे बाबा, देविदास वाघ, प्रेम ठाकूर, अशोक पगारे, सुभाष माने, दत्ता माने, झाकीर पठाण, गोकुळ ठोंबरे, कांताराव वाडे, राजेंद्र उबाळे व गावकरी मंडळी उपस्थित होते.
