February 23, 2025

वाळूजमहानगर, ता.28 – बजाजनगर येथील मशिया हॉलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी तेजज्ञान ग्लोबल फाउंडेशन हॅपी थॉट्स या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळ्याचा उत्साहात समारोप करण्यात आला.

या सोहळ्याचे उद्घाटन उद्योजक अनिल पाटील यांच्या हस्ते व उद्योजक राजाराम भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करताना प्रकाश देशपांडे यांनी फाउंडेशनचे संस्थापक तेजगुरू सरश्री यांच्या अध्यात्मिक कार्याचा परिचय करून दिला. तसेच फाउंडेशनच्या वतीने जागतिक शांततेसाठीच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत बाहेरच्या जगतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रथम आपले अंतर्मनात शांतता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जीवनात स्वल्पविराम घेण्याचे महत्त्व पटवून देताना हातातील मोबाईल काही वेळ बाजूला ठेवून प्रत्येकाने ध्यानात बसले पाहिजे, ध्यानाद्वारे आयुष्यात स्वल्पविराम निर्माण होईल आणि आपल्याला सर्वोच्च आनंदाचा स्वअनुभव घेता येईल. असे प्रतिपादन यावेळी प्रकाश देशपांडे यांनी केले. यावेळी साधकांना तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. यावेळी उपस्थित साधकांनी 21 मिनिटाचे ध्यान साधना करून स्वअनुभव घेतला. तसेच उपस्थित साधकांनी 21 दिवसाचे ध्यान करण्याचे संकल्प व्यक्त केला.तेज ज्ञान फाउंडेशन च्या वतीने भारतातील सुमारे 125 शहरांमध्ये या ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या सर्वसाधारकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा बुरकुले यांनी केले

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *